मी पाहिले कितीदा, तीरावरी बसून, मन चिंब पावसाळी, दाटला काळोख होता, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, येई सखी हसतमुखी, अशी अवीट गोडीची गाणी रसिकप्रिय करणारा आवाज म्हणजे श्रीकांत पारगावकर!
या चतुरस्त्र गायकाचे हे आत्मकथन आहे. सुरांच्या साथीनेच ते लहानाचे मोठे झाले. शिक्षणानंतर बँकेची नोकरी सुरु झाली. मात्र या सामान्य वाटणाऱ्या आयुष्याला कलेची जरतारी किनार लाभली होती. त्यामुळेच स्वरांच्या साथीने त्यांचे आयुष्य सोनेरी झाले. अनेक कलाकारांच्या संपर्कात ते आले.
वैविध्यपूर्ण गाणी गायली, संगीत रंगभूमी, चित्रपट, अल्बम अशासारख्या माध्यमातून त्यांनी रसिकांना भुरळ घातली. अनेक मानसन्मान लाभले. या संगीत कारकिर्दीसह वैयक्तिक जीवनातील वादळांनाही ते सामोरे गेले. त्याचेच हे कथन.